महाराष्ट्र हे देशातील अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जातं(Marathi News). कारण देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहरही महाराष्ट्रात येतं, मनोरंजन नगरी बॉलिवूडही इथेच वसली आहे आणि नोकरी-व्यवसाय, उद्योगाच्या संधींच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली अनेक शहरं महाराष्ट्रातच आहेत. देशातील संस्कृती आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण शिक्षण आणि कामानिमित्त दाखल होतात. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय अनेक संत, समाजसुधारक, साहित्यिकांचा जन्म महाराष्ट्र भूमीत झाला. महाराष्ट्र टाइम्सवर लोकसभा निवडणुकीचा निकाल २०२४ वाचा.